top of page

सिद्धार्थ...

बुद्ध होणं फार सोप्पंय... खरी कसोटी लागते, ती सिद्धार्थ होऊन राहण्यामध्ये... जातकांमध्ये असं सांगितलंय की फार नंतर बुद्ध जेव्हा कपिलवस्तुत परतले तेव्हा यशोधरेने त्यांना महालात बोलावून भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली... "यशोधरा दुखःतिरेकाने कदाचित बेशुद्ध होऊन पडेल किंवा भावनेच्या भरात तथागतांना जवळ धरण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा आनंद, तू तिला अडवू नकोस"... परंतु यशोधरेच्या महालात पोहोचल्यावर नम्रपणे अभिवादन करून यशोधरा अधोमुख झाली... तिने बुद्धाच्या डोळ्यात पाहिलं... तिला त्याच्या बुद्धत्वाचं तेज दिसत होतं... खरंतर "कसा आहेस?... इतकी वर्ष रानावनात राहिलास तेव्हा माझी जराही आठवण आली नाही का रे?" असं म्हणून आपला संताप हमसून हमसून व्यक्त करावा असंच तिला वाटत होतं... पण ती केवळ एवढंच म्हटली, "रानावनात जाऊन, कठोर तप करून जे बुद्धत्व तू मिळवलंस, ते इथेच राजमहालात राहून, मला तुझ्या मिठीत राहून नसतं मिळालं का रे?"... बुद्ध केवळ स्मित करत राहिला... अन तिथेच यशोधरेचा प्रवासही पूर्ण झाला...

Want to read more?

Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.

Recent Posts

See All
आठवणींचा कोरोना...

काही बोलू वाटेना, करू वाटेना म्हणून छातीत उमटणारी कळ काय थांबते का?...टोचत राहणारी अखंड आठवण... आपणच कमिटमेंटच्या हातोड्याने घट्ट ठोकून बसवलेली... आभाळ भरून येतं... आणि मग निथळत राहतं आठवणींच्या पावसा

 
 
 
हिंदोळा...

आज उशीरा उठलो आणि दुपारभर झोपून ही होतो... अगदी रात्री 8-8:30 ला जाग आली मग बाहेर येऊन बसलो... काय काय विचार येऊन गेले नुसते... आजकाल खूप थकवा जाणवतो... Persistent, chronic थकवा... आणि हा थकवा म्हणजे

 
 
 
bottom of page